आर. डी. सामंत कंपनीची चौकशी व्हावी – बाळ मानेंची मागणी

रत्नागिरी – रत्नागिरी शहरातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली असून यासाठी जबाबदार असणाऱ्या आर. डी. सामंत कंपनीची पारदर्शक चौकशी करून कंपनीसह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी आमदार बाळ माने यांनी केली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रावरून सत्तेचा दुरुपयोग करून याच कपंनीला तब्ब्ल 114 कोटी रुपयांची कामे दिल्याचे दिसून येत आहे. यात मोठा घोटाळा असून त्याची चौकशी होणे गरजेचे आहे असे बाळ माने यांनी ठामपणे सांगितले.

संपादक मकरंद भागवत

पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक विषयांवर परखड भाष्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *